ह्या सगल्यांची प्राणिति काय होणार ते मला ही माहित नाही ..पण समोर येत त्याप्रमाणे चालत रहाणेहेच हातात उरल्यावर दोष तरी कोणाला आणि किती देणार .. शेवटी आतल्या आत कुढ़त बसण्या शिवाय मी काही नाही करू शकत .. कधी कधी वाटत एक गोष्ट त्याच क्रमाने नियमित होते आहे ..फ़क्त माणस बदलत राहतात ..की माझच काहीतरी चुकत.. आता वाद करणेही सहजा मला टाळावस वाटत .. मनात कसला अणि कोणासाठी चा तिटकारा भारत आहे हे मलाच कळेनासं होत आहे .प्रत्येक ठिकाणी माझ्या बरोबर चालणारी माणस नसतात तर त्यांचे भास असतात ते मला फ़क्त सहानुभूति देत असतात .. पण करायची वेळ आली की ते भास विरून जातात गर्द कालाच्या छायेत ..आणि मी पुन्हा एकटी पड़ते .. मग होतात कधी कधी विश्वास घात.. पण मग मीच समजावते स्वताला "सोड ना भास होते ते त्याच्या कडून कसला विश्वास घात ..कसल्या अपेक्षा ??? अपेक्षा फक्त आपल्या कडून करायच्या असतात पण आपल म्हणून कोण रहिलच नाही तर का उगाच स्वताला त्रास ??"
No comments:
Post a Comment