About Me

My photo
प्रेम ... हा माझ्या आयुष्यातला अंत नसलेला शब्द आहे ... ह्या शब्दशिवाय माझ जीवन अपुर -अधूर आहे ... मला मनापासून प्रेम करायला सहज जमत म्हनुनच कधी कधी अपेक्षा भंग पण होतो ... अडीच अक्षरांचा हा शब्द ..पण माझ पूर्ण आयुष्य ह्याने व्यापल आहे ... मला विचारांचे पंख लावून आकाशात उडायला आवडत ... नको म्हनालेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा करायला आवडतात ... पावसाचे चार थेंब का असेना ते ही अनुभवायला आवडतात... मला मनसोक्त जगायला आवडत ......

Tuesday, November 9, 2010

निर्णय..........

मला गोतावळा  जमा करून रहायची मुलातच सवय नाही आहे.आणि कितीही आटापिटा करून मी प्रयत्न केला कोनाशिही जुळवून घ्यायचा तर ते ही दोन दिवस चालत व परत ये रे माझ्या मागल्या ..  कधी कधी खरच वाटत तुझ्याकड़े येउन बोलाव पण शेवटी माझीच मूल्य आणि तत्त्व आड़ येतात .
किती विचित्र आहे ना हे सगळ तुझ्या शिवाय माझा दिवस ही मावळत नसे पण आता ..................
कितीही कोणी ही माझ्या बरोबर असल ना तरी तुझी प्रत्येक गोष्टीत ...प्रत्येक ठिकाणी .... आठवण येते . खिडकित रोज उभ राहिल्यावर वाटत तुला कॉल करावा ...नाही होत पण मझ्याने ते .
मनाला जी शांतता ...हलकेपना तुझ्या शी बोलुन मिलतो तो कोणीही भरून काढू शकत नाही... किबहुना कोणी तुझी जागा कधी घेउच शकत नाही . अशीच कुठे मजा केलि ..भटकून आले की मग मला एकाच चाळा  असतो तुझ्या बरोबर घालवलेले दिवस आठवायचे .
किती धमाल होते ते दिवस ... रोज सकाळी तुझी स्टेशन वर वाट पहायची .. मग तू उशिरा आल्यावर तुझ्यावर राग काढायचा ...आणि दुसरया दिवशीही पुन्हा तेच ...
तुझ्या सोबत वालुतुन चालताना हातात टाकलेली हातांची साखली.. ओल्या वालुवर तुझ्या पावलावर पाउल टाकुन चालन ... तुझ ते मला अलगद उचलून घेण ... मस्ती अणि मस्करी ...एकमेकांबरोबर लावलेल्या पैजा ... तुझ्या खांद्यावर अलगद डोक ठेउन मिटलेले डोळे ..पाहिलेले स्वप्ने ...आणि मला लागु नए म्हणून हलुवार माझ्या डोक्यावर ठेवलेला  तुझा हात .. 
किती रम्य होते ते दिवस .. खरच ते माझे होते ??? माझी कित्येक स्वप्ने होती तुला घेउन बघितलेली ...आपल्या साठी बघितलेली ...  कशी आणि  कुठे समिकरने चुकली तेच कलल नाही ...स्वताचा अहंकार जपन्यात एवढ काही मी गमाउन बसेल मी अस कधी वाटलंच नाही.. कधी कधी वाटत स्वप्न तर नव्हती ना ती ..का दोन आयुष्य जगली आहे मी एका आयुष्यात ??? पण शेवटी झाल ते झाल आणि जे गमावल आहे ते मिलनार नाही हे मी पुरत ताडल्यामुले कधीही  तुझ्या कड़े न येण्याचा ...परतन्याचा निर्णय घेउनच मी पाठ फिरवली तुझ्याकड़े ...

Monday, November 8, 2010

पत्र.....

किती काळ मागे सरला...ह्या काळात असा एक ही दिवस नाही गेला जेव्हा तू आठवणीत आला नाहीस. तुझी सोबत मला नेहमी मिळत राहिली ती माझ्या आठवणीतुन , तुझ्या पत्रांतुन... जेव्हा जेव्हा मी ही पत्र वाचायला काढ़ते तेव्हा मला आपल्या पहिल्या भेटीपासून ते आत्ता रोज  तुझ्या येनारया पत्राची बघताना पाहिलेली वाट स्मरते. एकदा अशीच पत्र काढून वाचत असताना छबी येउन मला बिलगली..."आजू तू ही पत्र काय सारखी काढून काय वाचतेस. मी तुला टी scan करून मस्त pc वर टाकुन देते,मग तुला पाहिजे तेव्हा एका क्लिक वर वाचता येतील." मी तिला अजुन जवळ ओठत म्हटल "जी गंमत अशी वाचण्यात आहे ना ती कशातच नाही ,तू जा अणि खेळ पाहू." ती गेल्यावर  मला हसायला आल खरच मूल किती निष्पाप जिव असतात. जस जस मोठे होत जातो तश्या कालाच्या रेघा गहिरया होत जातात व हा निष्पापपना ही दैनदिन जीवनाच्या रहाट गाडयात गुडुप होउन जातो ..क़ालानुरूप खरेपनाचे सौदर्य नष्ट होत जाउन खोटे , स्वार्थी , अहंकार रूपी सुरकुत्या चेहरयावर वाढत जातात . मी हा विचार करते आहे खरी ,मग माझ्या ही चेहरयावर आहेत का त्या सुरकुत्या??? म्हणून मी लगबगीनं आरशासमोर आले ..पाहील तर डोळया च्या कड़े मात्र सुरकुत्या जमा झाल्या होत्या. आणि काहीतरी आठवून मला अजुनच हसायला आल तुझ्या पत्रानासुद्धा सुरकुत्या पडत आहेत ... नव्या पत्राला मी नेहमी हुन्गुन मग वाचायला घ्यायची पण आत्ता वयोमानाप्रमाने तेहि होत नाही .
           तुझ्या नि माझ्या स्वभावात साधर्म्य असुनही खुप भिन्नता होती म्हणून नेहमी लोकांच्या नजरेला भासनारया सारखेपनाला तू आणि मी कधीच पाहू नाही शकलो.दोघांचे  मार्ग शेवटी वेग-वेगले होते. मला लोकाना पदराशी बांधून ठेवायला नाही आवडत पण त्यांच्या वर प्रेम करायला ,त्यांची काळजी घ्यायला मनापासून जमत करण मी त्यांना आपल मानते ...तुझ ह्या अगदी उलट तुला प्रेम आणि काळजी करण दोन्ही जमत पण जर ती व्यक्ति तुझ्याशी बांधली गेली असेल तरच .. सगळ जग तुझ्या नावाचे गोडवे गात  फिरत पण मी मात्र मनोमन  किती खोड्या आहेत तुझ्यात ह्याची यादी करत . पण आवड़ने आणि प्रेम करने ह्या दोन गोष्टीत किती फरक आहे हे मला तुझ्या सानिध्यात आल्यावर उमगले. मी एकदा सहज म्हटले "किती आवडत मला तुझ्या सहवासात राहण, किंबहुना तूच आवडतोस .."  कधीही माझा शब्द खाली पडू देशील तर ना ...तुझ त्याला प्रत्युत्तर तयार.. "तुला मी लाख आवडत असेल पण तू कधी ना कधी मला सोडून जाशीलच कारण मी तुला फक्त आवडतो पण मी तुला नाही  सोडणार अगदी शेवटच्या श्वासापर्यंत कारण माझे तुझ्यावर जिवापाड प्रेम आहे "  मग मीच आपणहून तुझ्या गळ्यात पडत तुला माझ्या मिठीत खेचत विचारल होत , "म्हणजे तुला माझा 

कंटाळा  आला तरी नाही सोडणार ना ...???

 " तर त्यावर नुसते मंद स्मित करून  मान डोलावलिस आणि मी तुझ्यावर हावरटासारखी झेप घेत तुला खोल खोल आपल्या बाहुपाशात विलीन करून घेतल होत... किती आठवणी आहेत तुझ्या नि माझ्या ...आठवणी च्या नुसत्या गोड मधात घोलुन काढलेल्या साखळ्या तयार होतील इतक्या... खरच एकदा तरी ये इथे ..मला नाही तर तुझ्या नि माझ्या आठवणी ना  भेटायला . सगळ विसरून एकदा तरी माझा हो ...


Sunday, October 31, 2010

पहिले कधी तुझी आठवण आली तर नकळत  अश्रु जमा व्हायचे डोळ्यात .......पण आता त्यांची जागा तुझ्या बाळबोध कल्पना करणार्या अनेक विधि प्रतिमानी घेतली आहे .. मला स्वताला हे कधी  उमगल नाही तू हे अस पण विचार करत असशील ..आपण ज्या व्यक्ति कड़े एक मित्र ह्या भावाने पाहतो आहोत तो मात्र पूर्वीच्या जून्या नात्यामधे अजुन अड़कुन पडला आहे. खरच किती असह्य पीड़ा होतात मनाला ते फक्त मलाच माहित .. आणि एका बाजुला दयाही येते किती शुद्ध मुर्ख आहेस तू  जे माझ्या बद्दल असा विचार करत असशील .. . मी ते सगळ कधीच विसरून गेली आहे पण तुझ्या  मुळेते मी कधीच विसरु नाही शकत ..त्याला पर्याय म्हणून मी प्रत्येक प्रयत्न केले . पण शेवटी किती ही विसरायच म्हटल ना की कोण ना कोण येत आणि उगाच पुन्हा त्याच गोष्टी उगालत बसतात  . लोक लाख म्हणतात जाऊ देत झाल ते झाल विसरून जा ...विसरून जा तर आठवण च का करून देतात.  आता माझ्या कड़े फ़क्त एकच पर्याय उरला आहे.......

Tuesday, July 13, 2010

अंत

चालताना विचारांचा नुसता गोंधळ चालू असतो ...का ??? कशासाठी ??? कोणामुळे???  ह्या सर्व गोष्टी नेहमी ह्याच क्रमाने का घडतात . मला व्यक्त होण्यासाठी फक्त तिन गोष्टींचा आसरा आहे ..एक म्हणजे माझ वाचन,दूसरी माझी आई आणि तिसर जी काही इन मिन लोक ज्याना मी आपल मानते ती (ती मला आपल मानतात की नाही ह्या गोष्टीचा उलगडा मला कधीच झालेला नाही) .वाचून वाचून किती वाचणार शेवटी तो निर्जीव माझी तहान तरी किती भागवनार ....(???)पण एकेक करून ह्या सर्व गोष्टी माझ्यापासून वेगळ्या होत आहेत , ह्याला कारण मी तर नाही ??? मी कधी कधी दुसरया बद्दल एवढा विचार करते की त्या व्यक्ति ला ही ते नकोस होत . मग उगाच शब्दांची बाचाबाची ....आणि मग ह्याचा राग त्याच्यावर काढला जातो . माझ्या सर्वात जवळ असनारया एका व्यक्ति पासून सर्व प्रयत्ना अंती वेगळे  झाले कारण त्या नात्यात फ़क्त तुझ नि माझ उरल होत ...आपल अस काहीच नाही राहिल होत.. ह्या एका व्यक्ति पासून तुटताना एवढ्या पीड़ा झाल्या ... त्या वेदना.. ते दुःख मी परत सहन नाही करू शकणार ..म्हनुनच नेहमी कुठच्याही गोष्टीच शेवटच टोक गाठनारी मी आता प्रत्येक गोष्टीत मधेच माघार घेऊ लागले आहे ..आत मधे असलेला संताप , राग सगळ काही दाबुन ठेवायला शिकले आहे ...कितीही झाल तरी ह्या सर्व गोष्टी आतल्या आत ठेवून बाहेरून शांत रहायला शिकले आहे . पण जरी मी टोकाचे निर्णय घेण टालत असेल तरी कधीतरी ह्या सर्वांचा ज्वालामुखी होइल हे मला माहित आहे...तेव्हा मी प्रत्येक गोष्टींचा अंत करेल ... आणि ती वेळ आत्ता जवळ आली आहे

Monday, July 12, 2010

स्पर्श ...

चालताना पाय वालुवर भाजत होते तरी मला त्याच भान नव्हत .तुला शोधत शोधत किती लांब आले ते ही लक्षात नाही आल . शेवटी मी दमून त्या गरम वालुतच मटकन बसले ...वाटल आत्ता काही नाही उरल ..तुझ्या हातांचा तो स्पर्श शेवटचा होता . आतल्या आत मी हुंदके देऊन रडत होते पण अश्रूंचा मागमूस ही नव्हता . बाजूला एवढा गोंधळ होता पण माझ्या मनात भयानक शांतता होती .....क्षणा क्षणाला श्वास घेण असह्य होत ... तड़क जाउन जल समाधी घ्यावी आणि अंत करावा ह्या जीवनाचा पण तू नाहीस हे पाहून माझ्या शरीराचा एकेक अवयव अधु झाला होता.... सगलिकडे कालोख दाटून येत होता ....
  प्रकाशाची एक तिरीप सरळ माझ्या डोळ्यावर पडत होती .प्रयत्न करून ही डोळे उघडले जाट नव्हते . अजुन हे ह्रदय साथ का देत आहे जर त्याचा मालकच नाही आहे . मी वेदानाच्या ही पलिकडे होते. अचानक तोच स्पर्श पुन्हा झाला ...माझा भास असावा ...नाही पण हयावेलेस तो स्पर्श माझा भास नव्हता ..तो  तू होतास.. माझ्या बाजूला बसलेला ..अलगद माझ्या केसातून आई च्या मायेने कुरावालनारा .. प्रियकराच्या कालजिने  जवळ घेणारा... माझ्यात ताकद नसूनही मी तुला घट्ट मीठी मारली ..एवढी घट्ट की वाटल आत्ता ह्या मिठीत असतानाच माझे प्राण जावेत ...

Friday, July 2, 2010

आणि...

आज कधी नव्हे ते कपाटा मधला कपड्यांचा झालेला उकिरडा साफ़ करायला घेतला. रोज कपाट नाही उघडल तर हे सगळे कपडे अंगावर पडायचे म्हटल आज ह्या कामाची  विल्हेवाट लावावी..म्हणून सगळे कपडे जमिनीवर ओतले सगळा कप्पा खाली करत होते तर अपेक्षित नसलेल अनअपेक्षित पने तुझ्या आठवनित घालवलेला नाजुक क्षण सापडला. जितके मी तुला टाळायला पाहते तेवढा तू अधिक आठवत जातोस...नाही म्हटल तरी रोज त्याच ठिकाणाहून जाण होत .... तेच लोक दिसतात... किंवा तुझ्या आठवणीचा एखादा धागा सापडतो जसा आज सापडला...आज निम्मित फक्त एक कापड झाल होत. तुला हा स्कार्फ मी घातलेला अजिबात नाही आवडायचा आणि  म्हणून तू उगाच काही बाही करत बसायचास. एकदा तर तू तो स्कार्फ चक्क मातीतही मिळवला होतास पण मला जे आवडत त्या वर मनापासून प्रेम करण्याचा माझा स्वभाव असल्याने मी तो तसच उचलून रडत बसले होते ह्या अपेक्षेने की तू येशील आणि येउन माझी समजूत काढशील..मला जवळ ओठुन स्वताची चुक मान्य करशील.. पण तू ह्यातल काहीच केल नाहीस . मी तशीच वाट पाहत होते तुझी पण तू नाही आलास. तस म्हणायला तर 'मी' पना माझ्यात जास्त आहे पण त्या क्षणी वाटल आपल्या माणसाला जवळ घेउन प्रेमाने माफी मागण्यात कसला आला आहे एवढा अहंकार ... पण मला बापडिला हे कळायला बराच वेळ लागला की तो तुझा अहंकार नाही तर दुसरच काहीतरी होत... शेवटी मीच नेहमी प्रमाने माघार घेउन तुला सॉरी बोलुन तुझ्या बाहुपाशात विलीन झाले ..कदाचित मला त्याच व्यसन लागल होत म्हणून मी ओळखु शकले नाही की आत्ता तू माझ्या जवळ अजुन काहीच दिवस असणार आहे. तू माझ्या माघार घेण्याला used to झाला होता.त्यामुळेच की  काय तुझ्यासाठी  आत्ता मी फ़क्त एक वस्तू झाले होते.. हव तेव्हा तुझ ऐकनारी.. तुझ्या वर वेडया सारख प्रेम करणारी .. तुझ्या आवडी निवडीचा विचार करणारी ... हे सगळ करता करता मी स्वतालाच विसरत चालले होते हेच माझ्या लक्षात येत नव्हत.. पण आत्ता जेव्हा तू नाही आहेस तेव्हा मला जाणवत आहे हे की मी खरच किती मुर्ख होते की तुझ्या सारख्या बाह्यरूपावर प्रेम करणाऱ्या मनुष्यावर मी प्रेम करत होते...त्या एका स्कार्फ साठी तू मला रडवले तर.... नको मला तर विचारही नाही करवत. एक प्रकारे बरच झाल मीच तुझ्या पासून लांब झाले . माझ्या जवळ कारण नव्हत तेव्हा पण मला जाणवत होत हे प्रेम नाही आहे .. जर असत तर ते अस नसत .. मला तुझ्यातुन वेगळ व्हायला वेळ लागला..तरी आत्ता मी स्वतंत्र आहेत आणि आत्ता फ़क्त आठवणी आहेत ...मी जपून ठेवलेल्या ..ज्या अचानक चाहुल न देता येतात ..आणि...

Sunday, June 27, 2010

रात्र

सकाळची वेळ हाहा म्हणता संपते . दिवस धूसर होत जातो . सुर्याच्या नारंगी लाल प्रकाशात संध्याकाळ सरते आणि रात्र चालु होते. सकाळची वेळ कशी निघून जाते ते कळत नाही पण एकदा रात्र चढायला लागली की वेळ निघता निघत नाही . कितीही एकट रहायच म्हटल तरी तोच एकटे पणा रात्रीचा खायला उठतो. मनात विचारांचे तेच प्रवाह पुन्हा वाहू लागतात. त्या प्रवाहांचे एका प्रलयात रूपांतर होउन मनात एक खोल खड्डा पडतो . कुठे संपणार माझा हा एकटे पणा ? कधी समजेल मला की कोणीतरी माझ्या भावना समजत आहे ? असे अनेक प्रश्न त्या खड्ड्यात जमा होतात . मग त्या खड्ड्या च एका तळ्यात रूपांतरण होत..त्याच्या बाजूने नको असलेले विचार अणि माणस जमा होतात ... अशावेळी तुझा तो निरागस पाना मला भावतो. मनात विचारांच काहुर मजले असताना तुझा शांतपणा मला भावतो.. तुझ्या ओठांवरच ते हसू आणि हसताना भुवई छे केलेले विचित्र प्रकार मला हसायला लावतात . तू किती सुन्दर आहेस किती नाही ह्या प्रतवारित मी तुला कधीच तोलनार नाही कारण मला मिळणाऱ्या प्रेमाचा अखंड स्त्रोत आहेस . तुझ प्रेम आहे माझ्यावर की नाही हे पण मी बघणार नाही कारण मला माहित आहे मी जेवढ़ तुझ्यावर प्रेम करते तेवढ तू करशिलच अस नाही ...

बदल ...

बदल हा निसर्गाचा नियम आहे पण मला माणस अचानक त्यांचे स्वभाव कसे बदलतात हे अजतायागत समजल नाही किंबहुना मला ते जमत नाही म्हणून स्वताच  रंग रूप समोरच्या परिस्थिति नुसार बदलणारी माणस मला आवडत  नाही..आवडली तरी माझ नि त्यांच कधी पटत नाही. मी इतकी वर्ष इथे होतो म्हणून माझ्या वागण्यात मी अस बदल करून घेतला किंवा मी तो अस बोलला म्हणून मी तस बोललो अशी कारण देऊन कोणाला फसवू पाहतात...कोणाची सांत्वना करतात  समोरच्या माणसाची की स्वताच्या मनाची... मनाची समिकरने अचानक कशी बदलतात तेच मला कळत नाही. कोना बद्दल किती विचार नाही करायच ठरवल तरी मन दिवास्वप्न पाहत बसते आणि उद्दबत्तिचा सौम्य चटका बसावा तसा धक्का लागतो त्या विचाराना आणि मग मी स्वताला उगाच बजवाते कशाला नको त्या गोष्टीची अपेक्षा मी मला पाहिजे ते केल तर दुसारयावर का माझ्या अपेक्षांच बोझ. (माझी कोणाकडून अपेक्षा नसली तरी एक अपेक्षा प्रत्येक  मनुष्याला असते ती माझी ही आहे . मी ह्या जगातून जातांना निदान दोन अश्रु तरी गाळावित)