नेहमीची वलन लागत नव्हती. अचानक एक वलानावर माझा तोल गेला आणि स्वताला सावरन्यासाठी मी हात पुढे केला तर तू तो हात स्वताच्या उजव्या हातात घेत स्वताची बोट माझ्या बोटांच्या फटित घट्ट रोवलीस. समोरच्या बार ला पकडायला गेलेल्या माझ्या हातानी मला फसवल तर नाही ना म्हणुन मी क्षणाचा ही विलंब न करता फोनवर बोलायच थांबवत एकदा हाताकडे आणि तुझ्याकडे नजर फिरवली तर माझी बोट तुझ्या लांब सड़क मऊ लालसर बोटांमधे घट्ट गुंफून बसलेली...आणि तू बाहेर बघत शांत बसलेला जणू तू काही केलच नाही अशा आविर्भावात ...
मग मीही बाहेर बघत विचार करायला लागले की काय विचार करत असशील तू ....माझा ...छे...!!!
माझा कशाला विचार करशील तू , तसही माझ्यात आहे काय आणि मी तुला कधी काय दिल(फक्त माझ्या फटकल आणि जिव्हारी लागेल अस बोलन्याशिवाय) माझ्या पेक्षा तुझ्या आयुष्यात आलेल्या स्त्रीया जरा जास्तच चांगल्या होत्या किंवा आहेत. पण त्यानी जे तुला कधी ही नाही दिल ते मी नेहमी तुझ्यावर जेवढ़ पाहिजे तेवढ बरसत राहिले ...वेडया सारख उधळत राहिले ...पण तुला त्याची किंमत कधीच नाही कलली. मला काय वाटत ह्यापेक्षा तू मझ्याबदल काय विचार करतोस ते जास्त महत्वाच आहे .
haila! waste....haath pakda lekin kuch kiya nahi....sheh!
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete